मंत्रिपद गेलं खड्ड्यात, आम्ही त्यांना सोडणार नाही !

गुलाबराव पाटलांचा प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संताप
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 04, 2022 17:14 PM
views 582  views

जळगाव :  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, विरोधकच नाही तर सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून देखील भाजप आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, मंत्रिपद गेलं खड्ड्यात, असं प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवरायांच्याबाबतील कोणीही बोलण्याची गरज नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. ज्यांना शिवराय माहीत आहेत त्यांनीच बोलावं. शिवरायांबद्दल बोलताना आता आचारसंहिता करण्याची गरज आहे. कारण  सध्या कोणीही येतो आणि शिवरायांबद्दल बोलतो. मंत्रिपद गेलं खड्ड्यात त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.