सरकार पडण्याच्या चर्चेला महत्व देत नाही !

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा खोचक टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2022 19:07 PM
views 271  views

सावंतवाडी : आमदारांच निलंबन करायच की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्ट त्याबद्दल निकाल देवू शकत, परंतु निलंबन करायच की नाही हा निर्णय अध्यक्षांचा आहे. तर सरकार स्थापन करण की पाडण हे विधानसभा ठरवते. त्यामुळे  सरकार पडणार असं कुणी विधानसभेच्या बाहेर बोलत असेल, चर्चा करत असेल तर त्याला मी महत्व देत नाही, असा खोचक टोला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी लगावला.

 राज्यात खोक्याचे आरोप-प्रत्यारोप याबाबत त्यांना विचारले असता मला फक्त आंब्याच्ये खोके माहीत आहेत अशी टिपण्णी केली.