शिवसेना सोडून गेलेले निवडून येत नाहीत, असं म्हणता, केसरकरांनी दिलं सडेतोड उत्तर !

ही कोकणी माणसाची ताकद आहे : केसरकर
Edited by: भरत केसरकर
Published on: March 11, 2023 15:37 PM
views 155  views

सावंतवाडी : ज्यावेळी शिवसैनिकांना जिल्ह्यात फिरणं कठीण होत. कुणी रहायला हॉटेल देत नव्हत.  एवढी त्यावेळी नारायण राणेंची पकड जिल्ह्यात होती. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलो तेव्हा शिवसेनेला जिल्ह्यात यश संपादन करता आलं. याची जाणीव ठेवण आवश्यक होत. शिवसेना सोडून गेलेले निवडून येत नाहीत, असं म्हणता पण, सेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी १२ पैकी ११ आमदार निवडणून आणले. ही कोकणी माणसाची ताकद आहे, असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी इथं सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.