मुंबईत दहिहंडीतील वादाचा बदला घेतला

कांदिवलीत अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 01, 2022 14:56 PM
views 166  views

मुंबईः मुंबईतील कांदिवली परिसर गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. कांदिवलीत मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. दहीहंडीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतं. रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

रात्री १२च्या सुमारास कांदिवली पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यात दोन जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी चार तरुणांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. कांदिवली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


गोळी मारणारा व्यक्ती आणि ज्याला गोळी लागली आहे. ते सर्व आसपासच्या परिसरातील रहिवासी आहेत. दहिहंडीच्या वेळी त्यांच्यात काहीतर वाद झाला होता. त्या वादातून हा गोळीबार करण्यात आला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी दिली आहे. गोळीबारात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव अंकित यादव असल्याची माहिती मिळत आहे. आरोपींनी एकूण चार गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे.