खादी-ग्रामोद्योग वस्तु प्रदर्शन व विक्री केंद्रास मंत्री उदय सामंत यांची भेट

ग्रामीण उद्योजक-कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 21, 2022 13:37 PM
views 166  views

मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ग्रामीण उद्योजक आणि कारागिरांनी तयार केलेल्या खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन विक्रीस आलेल्या वस्तूंची माहिती घेत उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी या प्रदर्शनास अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल मंत्री सामंत ह्यांनी समाधान व्यक्त केले.