अन्यथा कणकवली पोलीस स्थानकात मोर्चा काढणार : अ‍ॅड. सुदीप कांबळे

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 22, 2024 10:44 AM
views 799  views

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग ओलांडणाऱ्या माय - लेकाला जानवली येथे कारने जोरदार धडक दिल्याने शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची आई मंगला जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. चालक वेदांत शेलार याच्यावर 304 कलम लावावे व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी केली आहे. कणकवली पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अ‍ॅड. कांबळे यांनी योग्य ती कार्यवाही न झाल्यास गुरुवार 25 एप्रिलला कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्‍वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिले. अपघात प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.