कर्तृत्‍ववान नेतृत्‍व...

नितेश राणे वाढदिवस विशेष
Edited by: ब्‍युरो न्यूज
Published on: June 23, 2025 13:15 PM
views 8  views

भावी संवाद कौशल्ये, विश्लेषणात्मक विचार, सक्रिय श्रवण, आणि तर्कशुद्ध विचारसरणी, निर्णयक्षमता, दूरदृष्‍टी, विकसनशील संकल्‍पना आणि जबाबदारी या गोष्‍टींतून विकासाचा अंकुर फुलविणारे महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेतील कोकणचे धडाडीचे नेतृत्‍व म्‍हणजे नितेश नारायणराव राणे! प्रशासनाला गतिमान करतानाच, सर्वसामान्‍य हा विकासाचा केंद्रबिंदू मानून प्रसंगी उत्‍कृष्‍ट कार्य करणार्‍यांच्‍या पाठिवर कौतुकाची थाप पडते, अन्‌ दिरंगाईला ते नेहमी फटकारतात. पर्यटन, रोजगार, कृषी या त्रिसूत्रीवर जिल्‍ह्याच्‍या विकासाचा आराखडा ‘एआय’ तंत्रज्ञानाच्‍या साहाय्‍याने आखून आगामी काळात आत्‍मनिर्भर सिंधुदुर्ग बनविण्‍याच्‍या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. मंत्रिपदाचा कार्यभार स्‍वीकारल्‍यानंतर अल्‍पावधीतच घेतलेले लोककल्‍याणकारी, क्रांतिकारी निर्णय त्‍यांच्‍या निर्णयक्षमतेची चुणूक दाखवतात. अशा या समाजप्रिय नेतृत्‍वाचा आज वाढदिवस! 

राज्यात आपल्या कामाने आणि कर्तृत्‍वाने नेहमी चर्चेत असणाऱ्या निवडक मंत्र्यांपैकी एक नाव म्हणजे राज्याचे मत्‍स्‍यविकास आणि बंदरे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश नारायण राणे. मंत्रिपदाची धुरा हातात घेतल्यावर कधीही चर्चेत न असणाऱ्या या खात्याची चर्चा राज्यात अवघ्या काही दिवसात होऊ लागली. पहिल्या काही दिवसांत नितेश राणेंनी घेतलेले निर्णय लक्षवेधी ठरले. वडील नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल टाकत आपली वेगळी राजकीय ओळख नितेश राणेंनी राजकारणात निर्माण केलीय.

त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हा नेहमीच कोकण आणि कोकणातला सामान्य माणूस राहिलाय. कोकणातील सामान्य माणसाच्या जीवनात सुख - शांती - समाधान आणि आर्थिक स्थैर्य कसं येईल यासाठी जसे नारायण राणे प्रयत्नशील असतात तसे नितेश राणेही आग्रही असतात.म्हणून कोकणातील सामान्य माणसांची कामे होताना कसूर झाल्यास त्याची त्यांनी कधीही दयामाया केली नाही. मग तो कोणताही अधिकारी असो, विरोधी पक्षातला नेता असो किवा आपलाच कार्यकर्ता असो.सर्वांना एकच न्याय, अशीच नितेश राणेंची कार्यपद्धती.

राजकीय गणिते मोठ्या शिताफीने सोडवण्याचं कसब नितेश राणेंकडे आहे. कुठे गुगली टाकायची आणि कुठे भेदक मारा करायचा आणि विरोधकांना क्लिन बोल्ड करायचं एवढी राजकीय मुत्सदेगिरी नितेश राणे यांच्यात क्षणोक्षणी दिसून येते. जिल्हा बँक, लोकसभा आणि  विधानसभा निवडणुकांमध्ये नितेश राणेंनी तिन्ही मतदारसंघात केलेल्या मोर्चेबांधणीमुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय सोपा झाल्याचे बोलले जातंय.

विरोधी पक्षात असताना कोकणवासियांचा कोणताही प्रश्न असो, तो पोटतिडकीने आणि तेवढ्याच आक्रमकतेने सभागृहात मांडताना नितेश राणे सभागृह दणाणून सोडतात. त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचं अनेकदा मोठ्या नेत्यांकडून कौतुकही झालंय.कोकणाचा कोणताही प्रश्न मांडताना, तो तडीस नेताना एक वेगळी तळमळ नितेश राणे यांच्यात कायमच दिसते. सर्वच अधिवेशनांमध्ये नितेश राणेंनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेतली गेलीय. त्यामुळे सभागृहातही त्यांचा वेगळाच दबदबा असल्याचं पाहायला मिळते. 

नितेश राणेंना राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं तेही कॅबिनेट मंत्रिपद. खाते कोणतही असो लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केलं तर प्रशासनात शिस्त आणली तर ते खाते लोकप्रिय होते हे नितेश राणेंनी दाखवून दिले. आपल्या मंत्रिपदासोबतचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रशासन अक्षरशः पळवून काम सुरु केलं आहे. जनता दरबार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केलेला पालकमंत्री कक्ष यात सामान्य माणसांची असलेली गर्दी ही बरच काही सांगून जाते. 

कोकणातील सर्वसामान्य नागरिकांची कामे सुलभ आणि जलद कशी होतील यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी सुरु केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जिल्ह्यात नागरिकांच्या खासकरून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य, ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी त्यांनी संबधित विभागाला काम करण्याचे आदेश आणि मोकळीकही दिली आहे. जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वप्नही त्यांनी सत्यात उतरवलं आहे. जिल्ह्यात प्राणी संग्रहालय होण्यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा राज्यात अव्वल आहे.

याच श्रेयही नितेश राणेंनाचं जाते. जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्याचबरोबर नौसेनेची गुलदार नौका जिल्ह्यात आणण्यात नितेश राणेंनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश आलय. यामुळे जिल्ह्यात पर्यटनाचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. मत्‍स्‍य व्यवसायायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाला. भाऊचा धक्का ते मालवण पर्यंत जलवाहतूकही मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नामुळेच शक्य होणार आहे. अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात त्यांनी कठोर कारवाईचं धोरण स्वीकारल्यानंतर अशा प्रकारची मासेमारी कमी होऊन स्थानिक मच्छीमार  बांधवाना त्याचा फायदा होत आहे. द्रोण टेहळणीमुळे परराज्यातील मच्छीमार बोटींवर कारवाईचं प्रमाणही वाढलेलं आहे.


राजकीय कामासोबतच सामाजिक काम आणि जिल्ह्यातील लोकांच्या - कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्यात नितेश राणे नेहमीच पुढे असतात. जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सामान्य कोकणवासियांवर संकट आल्याचे कळल्यास तिथे पोहोचणार आणि धीर देणार पाहिलं नाव असत ते नितेश राणें यांचेच. पायाला भिंगरी लावून, ते आजही जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढत असतात. 

नारायण राणेंनी केलेल्या कामाचे आशीर्वाद नितेश राणेंना कोकणी जनता देतचं आलीय. मात्र, त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी, तरुण आणि अबाल वृद्ध यांच्या हृदयात आपलेपणा निर्माण करण्याची किमया नितेश राणेंनी साधलीय. आज कोकणासोबतच नितेश राणेंच नाव राज्यभर चर्चेत असते ते त्यांच्या कार्यपद्धतीमुळे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युवा नेते कार्यरत आहेत. त्यात सर्वांचेच लक्ष वेधणारे नाव कोणाच असेल तर ते नितेश राणेंचचं. राज्यात कुठेही गेले तरी नितेश राणेंचे जल्लोषी स्वागत पाहून त्यांची तरुणांमध्ये किती क्रेझ आहे हे दिसून येते.

उत्तम व्यवस्थापन कौशल्य, दाणगा जनसंपर्क, वाचन, विचारांचा ठामपणा हे सर्व गुण त्यांच्या कामात आणि कृतीत दिसूंन येतात. कोकण आणि कोकणचा विकास हे नितेश राणेंच्या जिव्हाळ्याचे विषय. जेव्हा कोकणच्या विकासाचा मुद्दा येतोय तेव्हा नितेश राणे राजकारण सोडून  विरोधकांनाही सोबत घेण्यास आग्रही असतात. यातूनच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. आपण जनतेचे सेवक आहोत पदे कायमस्वरूपी कोणाकडे नसतात. ती येतात आणि जातात मात्र, आपल्या पदांचा वापर कोकणासाठी व्हायला हवा, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं. अशा कोकण विकासाचा 

ध्यास घेतलेल्या युवा नेत्याचा भविष्यकाळ उज्‍ज्वल आहे. 

भगवान शेलटे

उपसंपादक

कोकणसाद LIVE