
नवी दिल्ली : देशातील महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तेलंगणासह अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत होते.














