LIVE UPDATES

आळंदीच्या प्रवेशद्वारावरील चारही पूल पाण्याखाली

प्रशासनाच्या वारकऱ्यांना आळंदीत न येण्याच्या सूचना
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 06, 2026 14:17 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : आषाढी पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे बुधवार दिनांक ८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार  आहे. सध्यस्थितीत इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे आळंदी शहरात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी आळंदी येथे येऊ नये,  असे आवाहन प्रशासनाने केले आहे . प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे असे सूचित करण्यात आले आहे .