KOJAGIRI SPECIAL | कशी साजरी होते कोजागिरी पौर्णिमा..काय आहे महत्व !

कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व | वाचा खास लेख
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 09, 2022 15:12 PM
views 455  views

कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते.कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.

पण हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते.आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.

कोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्याप्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे.[७] बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंत जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आह


लक्ष्मीपूजन श्लोक


सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।

परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[९]

या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.


खगोलशास्त्रदृष्ट्या महत्त्व


या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.


धार्मिक महत्त्व


या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीचआणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते.उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहर लक्ष्मी व इंद, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.

ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.

विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.

पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात,श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात.द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.


सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व


या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.


कृषी संबंधित-नवान्न पौर्णिमा


कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.


निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.


या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असतेयासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.


कोजागिरी पोर्णिमा आणि आपले आरोग्य 

                  आज कोजागिरी पोर्णिमा... अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा असे म्हटले जाते. संपूर्ण देशभरात कोजागिरी पोर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी असं मानलं जातं की, या दिवशी खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाल्याने अनेक रोगांपासून सुटका होते आणि आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. यामागील कारण असं सांगितलं जातं की, या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांनी पूर्ण असतो. त्यामुळे रात्री 12 वाजल्यानंतर खीर किंवा मसाला दूध घेणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.


 कोजागिरी पोर्णिमेला खीर खाण्याचे फायदे :


1. असं मानलं जातं की, कोजागिरी पोर्णिमेला तयार करण्यात आलेली खीर अस्थमा असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असते. 


2. अस्थमाच्या रूग्णांसोबतच कोजागिरी पोर्णिमेची खीर स्किनच्या प्रॉब्लेम्सनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर ठरतं. असं म्हटलं जातं की, कोणी स्किन प्रॉब्लेम्सनी त्रस्त असाल तर कोजागिरीला खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाणं त्याच्यासाठी फायदेशीर ठरतं. 


3. त्याचप्रमाणे अशीही मान्यता आहे की, ही खीर खाल्याने डोळ्यांशी निगडीत असलेले सर्व आजार दूर होण्यास फायदेशीर ठरतात. यामागे अशी मान्यता आहे की, कोजागिरी पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश जास्त असतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमजोर असणाऱ्या लोकांनी या चंद्राकडे एकटक पाहणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे त्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते. 


4. डोळे, दमा आणि त्वचेचे रोगांवर गुणकारी ठरणारी कोजागिरी पोर्णिमेला खुल्या आकाशाखाली तयार केलेली खीर हृदय विकारांनी त्रस्त असणाऱ्या रूग्णांसोबतच, फुफ्फुसांच्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रूग्णांठीही फायदेशीर ठरते.


आदिवासी जनजातीत


भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते.मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.


पर्यटन


कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो.