४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना...!

Edited by:
Published on: June 14, 2024 06:40 AM
views 904  views

कुवेतच्या मंगफ भागातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ४५ जण भारतीय असल्याचे समजते. या ४५ जणांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी कुवेतहून विमान रवाना झालं आहे. केंद्रीय मंत्री कीर्ती वधन सिंग यांनी यासंदर्भातील माहिती दिली. हे विमान केरळच्या कोची इथे उतरणार आहे.