महानिर्मितीकडे काही दिवसांचाच कोळसा साठा..?

Edited by:
Published on: September 26, 2023 11:04 AM
views 390  views

नागपूर : राज्यात पावसाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्याने साठा केवळ दोन ते आठ दिवसांचा राहिला आहे. खासगी कोल वाॅशरिजमध्ये मात्र महानिर्मितीचा लक्षावधी टन कोळसा पडून आहे. त्यामुळे कोळसा टंचाईच्या नावावर वीजनिर्मिती विस्कळीत झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे. राज्यात भर पावसात विजेची मागणी २६ हजार मेगावाॅटपर्यंत वाढली होती. त्यापैकी २३ हजार मेगावाॅटच्या जवळपासची मागणी महावितरणची होती.