
सिंधुदुर्गनगरी : जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालवधीत स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. मकरंद देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र ,सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया,गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे . एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्व सांगणेत येणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावणेत येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता चावडी सुरू करणेत येणार आहे. गावातील शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्यकेंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेणेत येणार आहे. ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे यामध्ये जैविक व अजैविक कचरा यासाठी स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करणे येणार आहे. अंगणवाड्यामध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे. घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती करण्याची मोहीम ग्रामपंचायत ने हातात घेऊन शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी शौचालयांची नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता विशेष विशेष स्वच्छता संमेलन भरवण्यात यावे यामध्ये विद्यार्थी शिक्षक यांचे मध्यान भोजन यासाठीची स्वच्छता व स्वच्छते बद्दल जागृता सत्र घेण्यात येणार आहे तसेच तसेच गावामध्ये ग्रे वॉटर ग्रे वॉटर मॅनेजमेंट बाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष करून प्रत्येक सेप्टिक टॅंक असलेल्या शौचालयांना शोषखड्डा तयार करणे घरातील सांडपाणी परसबाग किंवा शोषखड्डा करून त्यातच सोडणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेणेत येणार आहे.
छतावरील पाऊस पाणी संकलन करून पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.पाणलोट क्षेत्र/जलस्रोत इत्यादी भोवती स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम राबविणेत येणार आहे. शालेय स्तरावरील चित्रकला, निबंध लेखन, घोषवाक्य लेखन स्पर्धा हि अतिसाराचा सामना करण्यासाठी सुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर आयोजन करणेत येणार आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना सुरक्षित पाणी वापराच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणेत येणार आहे. स्टॉप डायरिया अभियान गाव पातळीवर यशस्वीपणे राबविण्यात यावे असे आवाहन श्री. मकरंद देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.