कणकवलीत बाजारादिवशी 30 टन काजूबीची आवक

गेल्या वर्षी पेक्षा आवक घटली
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 18, 2026 13:25 PM
views 41  views

कणकवली : यंदा आंबा पिकाबरोबर काजूच्या पिकामध्ये देखील घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी काजूबीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. पाडव्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी गावातील वाडीवस्तीतील शेतकरी काजू बी कणकवली शहरात मंगळवारच्या बाजारादिवशी येऊन व्यापाऱ्यांना देतो आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या घरातील बाजार सामान व अन्य वस्तूंची खरेदी करत असतो.

गेल्या वर्षी साधारणता 60 टन काजू बी ची आवक पाडव्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी झाली होती पण यापेक्षा निम्मे म्हणजे 30 टनापर्यंत काजू बी कणकवलीच्या बाजारादिवशी आल्याचे बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार समजत आहे. काजू व्यापारी राजू गवाणकर यांनी देखील मागील वर्षीपेक्षा बाजारामध्ये निम्मे काजू आजच्या दिवशी दिसत असल्याचे सांगितले. त्यामुळे आंबा पिकाबरोबर काजू बीची देखील आवक घटली आहे आणि त्याचा परिणाम आता व्यापारावर आणि परिणामी कणकवलीच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.