
सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनस कुठे आहे ? ते खरंच आहे का ? की हरवलं ? असा सवाल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आला आहे. कोकणचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव जवळ येतोय. नवीन गाड्या हव्या आहेत. परंतु, कोकणात टर्मिनस नसल्याने हक्काच्या गाड्या नाहीत. तिकिटांचा काळाबाजार, कोटा कमी अशीही खंत व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ जून २०१५ रोजी मोठ्या उत्साहात सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा पाया रचण्यासाठी कुदळ मारली होती. पण, जवळपास एक दशक उलटल तरी हा प्रकल्प अद्याप अपूर्णच आहे. ज्याचा पाया फडणवीस रचत होते ते टर्मिनस अस्तित्वात आहे की नाही ? हा प्रश्न आहे. कोणतीही नवी गाडी नाही, पायाभूत सुविधा नाही. कोकणच्या लोकांना कोणताही फायदा नाही. फक्त वचनच दिली जात असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता यासाठीचा निधी कुठे गेला?, का कोणी याची जबाबदारी घेत नाही? कोंकण रेल्वे केवळ सावंतवाडीच्या नव्हे तर कोकण विकासाकडे का दुर्लक्ष करत आहे? हे विचारण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया संघटनेकडून दिली आहे. कोकणचा उत्सव गणेशोत्सव जवळ येतोय. नवीन गाड्या हव्यात. परंतु, कोकणात टर्मिनस नसल्याने हक्काच्या गाड्या नाहीत. तिकिटांचा काळाबाजार, हक्काच्या गाड्या नाहीत त्यामुळे तिकीट कोटा कमी, तिकीटे मिळत नाहीत अशीही खंत व्यक्त केली आहे.