आपल्या चार वर्षाच्या खासदारकीत नारायण राणेंनी जिल्ह्याला काय दिले?

आमदार वैभव नाईकांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
Edited by: भरत केसरकर
Published on: February 25, 2023 17:51 PM
views 283  views

कुडाळ : शिवसेनेने आज सर्वानाच सर्व काय दिल // माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला // शिवसेनेचा शेवटचा आमदार गेला तरी मी शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचासोबत राहणार // आज काळ फार कठीण आहे //पण तुम्ही आणि मी शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहील पाहिजे // इडी व अन्य काही भिती दाखवत आहेत, पण मी घाबरून जाणारा नाही // वेळ कोणतीही येवूदे पण डगमगून जावू नका // BBC सारख्या आंतरराष्ट्रीय चॅनलवर विरोधात मुलाखत दिली म्हणून या चॅनलवर रेड टाकण्याचे काम भाजपने केले // या जिल्ह्याचा खरा विकास जर कोणी केला असेल तर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला // आता बोलणारे पुढारी दोन वर्षां पूर्वी कुठे होते? // ज्याची मेडीकल काॅलेज जिल्ह्यात आहेत त्यानी किती फुकट उपचार केलेत? // वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला // मी जलजीवनचा आराखडा ४६० कोटीवर नेला // मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कोणी केल? // तर हे काम शिवसेनेने केल // चार वर्षात नारायण राणेंनी कोणते विकासाचे काम केलीत? // उज्ज्वला गॅस योजनेने जिल्ह्यातील भाजपची कार्यालये सिलेंडरने भरतील // भाजप लोकांचे चित्र विचलित करण्यासाठी नको ती आंदोलने करतय // या जिल्ह्याच्या विकासासाठी आमची सत्ता नसली तरी रस्त्यावर उतरून आवाज उठविण्यासाठी मी तुमच्यासोबत सज्ज आहे // शिवसेनेने साठ वर्षात जे दिले ते कोणीच देवू शकत नाही //सुभाष देसाई यांनी आज उतरत्या वयात शिवसेनेची पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम केलय // आज जनतेमध्ये अस वातावरण आहे कधी एकदा निवडणूक लागते आणि आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करतोय // अशी धारणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची झाली आहे // आता आपण जिंकेपर्यंत लढायच आहे // यासाठी सज्ज व्हा, असे भावनिक आवाहन करीत कुडाळ मालवणचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जणू निवडणुकीचे रणशिंग फुंकले // कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आयोजीत "शिवगर्जना" अभियानांतर्गत आता जिंकेपर्यंत लढायच, ह्या अभियानांतर्गत आमदार वैभव नाईक बोलत होते //