आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला आर्थिक व सर्वांगीण विकास साधावा

दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचं प्रतिपादन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 09, 2023 17:29 PM
views 247  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला आर्थिक व सर्वांगीण विकास साधावा, असे ठाम मत दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी आयोजित केलेल्या शेतकरी बागायतदार मेळावा कृषी प्रदर्शन कार्यक्रम वेळी व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत सौ.  शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कोकण कृषी विद्यापीठ संचालक प्रमोद सावंत, तळवडे शिक्षण मंडळचे बाळा पेडणेकर, सरपंच तळवडे विनिता मेस्त्री, उपसरपंच प्राजक्ता गावडे, प्राचार्य डी. एस. भारमाल, एम बी कुलकर्णी, कृषि अधिकारी यशवंत गव्हाणे, संहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव अध्यक्ष दिलीप गोडकर , सचिव मोतीराम टोपले खजिनदार हनुमंत देसाई , तसेच तळवडे श्री जनता विद्यालय प्राचार्य प्रतापराव देसाई, तसेच या कार्यक्रमवेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, रविंद्र परब, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नेमळे कौल कारखाना अध्यक्ष श्री राऊळ, बाळा जाधव, राजाराम गावडे, बंड्या परब, कुंदा पै. दादा परब, विजय नाईक.तसेच कृषि अधिकारी तसेच मोठया प्रमाणात विवध क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी यावेळी उपस्थित होते.


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मेळाव्यात उपस्थित झाले पण आचारसंहिता लागू झाली, त्यामुळे ते व्यासपीठावर उपस्थित राहीले नाहीत. यावेळी या कार्यक्रमामुळे प्रगतशील शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील व इतर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचा खास सन्मान उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.


यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे .शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव आर्थिक सहकार्य ही बँक करेल असे इल मत यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मत व्यक्त केले. ही बँक शेतीपूरक व्यवसायाला व शेतकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत आहे .सिंधुदुर्ग जिल्हा हा दुग्ध व्यवसायात अवल दर्जाचा जिल्हा ठरणार आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून जिल्ह्यातील शेतकरी सहकार्य करत आहे तसेच नवीन नवीन उपक्रम जिल्हा बँके मार्फत जिल्हा राबवले जात आहेत .यासाठी शेतकऱ्यांनी पण चांगला सहभाग घेऊन आपल्या सर्वांगीण विकास साधावा असे मत यावेळी मत व्यक्त केले . महाराष्ट्राचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.


यावेळी आयोजित केलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.पदवीधर मतदार संघ निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांनी फक्त या कार्यक्रमाला भेट दिली. व आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी या शेतकरी बागायतदार मेळाव्या वेळी शेतकऱ्यांना माती परीक्षण व त्याचे महत्त्व शेतातील आधुनिक तंत्रज्ञान व खत व्यवस्थापन, कोकणातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेतीचे विविध पर्याय ,कोकणातील शेळी पालन व्यवसाय संधी, आंबा व काजू पीक संरक्षण शेती व फळ बागायती संदर्भात शासनाच्या योजना व सवलती यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी डॉ. नितीन सावंत , यशवंत गवाणे,सुमीत भोसले, डॉ विजयकुमार देसाई, यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती संदर्भात व पूरक व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन केले . तसेच शेतकऱ्यांनी शेती करताना कोणती काळजी घ्यावी कोणत्या औषधाचां वापर करावा याविषयी यावेळी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले, तळवडे येथील श्री जनता विद्यालय मध्ये प्रथमच भव्य शेतकरी बागायतदार मेळावा आयोजित केला होता, सहयोग ग्राम विकास मंडळ गरड माजगाव व तळवडे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला तळवडे पंचकोशीतील व सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या शेतकरी मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी सहयोग ग्राम विकास मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवर यांचा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व कुलगुरु डॉ संजय सावंत यांचाही खास सत्कार यावेळी करण्यात आला.