मालवण : खासदार विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे कौतुक केले आहे. वैभव नाईक हे मतदारसंघाला पूर्णपणे वेळ देत पक्ष वाढवत आहेत. तर हरी खोबरेकर हे पक्षाची बाजू ठामपणे मांडत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेला निधी, योजना, याबाबत लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार विनायक राऊत आज मालवण दौऱ्यावर होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार वैभव नाईक हे दररोज मतदारसंघासाठी वेळ देत आहेत. गावागावात फिरून संघटना वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. तसे दौरे ते आधी जाहीर करत आहेत. प्रत्येक गावातील कार्यक्रमांना हजेरी लावून जनतेत मिसळत आहेत. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी असेच कार्य करणे अपेक्षित आहे असे सांगितले.
तर हरी खोबरेकर हे पक्षाची भूमिका योग्यरीत्या मिडियासमोर मांडत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गसाठी दिलेली सिंधुरत्न योजना, शासकीय मेडिकल कॉलेज, विकासकामांसाठी कोट्यवधी निधी याबाबत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर पक्षाची बाजू ठासून मांडत आहेत. असे सांगत खासदार विनायक राऊत यांनी हरी खोबरेकर यांचेही कौतुक केले.