राजकारण मन रमण्यासाठी नसतं

वैभव नाईक यांचा निलेश राणे यांना टोला
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 26, 2023 19:29 PM
views 437  views

कुडाळ : राजकारण असो किंवा समाजकारण हे मन रमण्यासाठी नसतं तर लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी असतं , तर लोकप्रतिनिधी हा  आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा, राजकारणात होत असलेल्या कुरघोडीचा वावड्या उठवत नाही, तर निलेश राणे ज्या पक्षात असतात तिथे त्या पक्षाचे नेतृत्व मानत नाहीत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता यावर बोलताना निलेश राणे यांच्या सह भाजपवर टीका करत जर केंद्रीय मंत्र्यांच्या सुपुत्राचेच राजकारणात मन रमत नसेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये नक्की कोणाला अच्छे दिन आले आहेत, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. असे सांगत निलेश राणे हे कुठच्याच पक्षाचे नेतृत्व न मानणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ते पक्षाच्या विश्वास संपादन करू शकत नाहीत त्यामुळे त्यांचा हा पक्षाचा वैयक्तिक निर्णय असून त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली 


तर पुढे बोलताना आमदार श्री. नाईक म्हणाले,भारतीय जनता पार्टीमध्ये अच्छे दिन  कोणालाच नाहीत,  हे जनतेलाही आता समजून चुकल आहे,  या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात किती विकास झाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर जी मतदार संघात कामे सुरू आहेत ती उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना व माझ्या पाठपुरावाने सुरू आहेत असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. तर सत्ता असो वा नसो विकास कामांबाबत आमच्यावर अन्याय अपमान होतो. तरी आम्ही लोकांसाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार. असेही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.