कणकवली : आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कणकवली च्या शाखा व्यवस्थापकांना लाचलुचपत (एसीबीची) नोटीस आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उबाठा चे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या व्यवसायाशी निगडित असलेल्या पतसंस्था मधून काय व्यवहार झाले याबाबतचे पडताळणी केली जात आहे.त्यासाठी ५ डिसेंबर रोजी संपूर्ण माहिती सह रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश या पतसंस्थेच्या शाखा अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे वैभव नाईक यांचे धाबे दणाणले आहेत.
आ.वैभव नाईक यांना रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू झाली होती. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांची मोजमापे घेतली गेली होती. त्यांनतर त्यांचे उद्योग धंदे व्यवसाय यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्या संबंधित व्यवस्थापकाना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये आता मोठी वाढ आहे.त्यामुळे आमदार नाईक यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे.