सावंतवाडीत निघाली तिरंगा रॅली

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2025 20:50 PM
views 29  views

सावंतवाडी : पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रुर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाहक बळी गेले. मात्र, ऑपरेशन सिंदूर सारख्या धारदार हत्याराने भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तानच्या दुष्कृत्याला प्रत्युत्तर देत चारीमुंड्याचित करून देशाच्या सौभाग्यवतींच्या कुंकवाची लाज राखली. त्या सैन्य दलाच्या सैनिकांना वंदन करण्यासाठी सावंतवाडीतून तिरंगा रॅली निघते याचा आपल्याला अभिमान आहे असे गौरवोद्गार आमदार दीपक केसरकर यांनी काढले. 

आमदार श्री केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय तिरंगा रॅली आज शहरातून काढण्यात आली. या रॅलीचा शेवट शहरातील शिवरामराजे पुतळानजीक करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आम. केसरकर बोलत होते. सावंतवाडी गांधी चौक येथून सुरू झालेली ही रॅली शहरातून काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय असा जयघोष करत सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पावसाचे व्यत्यय असताना सुद्धा भारतीय भारतीय सैन्य दलाने केलेल्या कार्याचे कौतुक आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग दर्शवला.        

दरम्यान देशाच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेने केलेल्या क्रूर अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. भारतीय सैनिकांच्या या शौर्याला वंदन म्हणून देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना त्यांना या रॅलीच्या माध्यमातून वंदन करतानाच ज्या पर्यटकांचे बळी गेले त्यांनाही आदरांजली अर्पण करतो. संस्थानकालीन थोर परंपरा असलेल्या या सावंतवाडीच्या भूमीतून ही रॅली निघते याचाही आपल्याला अभिमान वाटतो असेही आमदार केसरकर म्हणाले.

या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपाचे महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर,भाजपाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष बाळू देसाई,  सेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर,अशोक दळवी, मनोज नाईक,सुरेंद्र बांदेकर, अर्चित पोकळे, सुधा कवठणकर,भारती मोरे,शुभांगी सुकी, अक्षय पार्सेकर,अॅड.परिमल नाईक, भाजपाचे दिलीप भालेकर दिपाली भालेकर,कोलगाव सरपंच संतोष राऊळ,भाजपा महिला शहरप्रमुख मोहिनी मडगावकर, संदीप गावडे, बंटी पुरोहित, गुरु मटकर, संदीप हळदणकर,हर्षद ढेरे, पुखराज पुरोहित, शर्वरी धारगळकर, मेघना राऊळ आदी सर्व पक्षीय महीला पदाधकारी, नागरिक सहभागी झाले होते.