कलमठ येथील वीज समस्या मार्गी लागण्यास सुरुवात...!

Edited by:
Published on: June 13, 2023 11:28 AM
views 139  views

कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना कलमठ यांच्या वतीने महावितरण चे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाची दाखल घेऊन पावसाळ्यापूर्वी कलमठ गावातील विद्युत जीर्ण पोल, तारांवरील झाडी, जीर्ण तारा बफळण्याचे काम सोमवार पासून सुरु करण्यात आली. यामुळे युवासेनेने दिलेल्या केलेल्या मागणीला यश आले असून, कलमठ मधील वीज समस्यां सुटण्यासाठी याची मदत होणार आहे. युवा सेनेने केलेल्या कामा बद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित मार्गी लावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती युवासेना विभाग प्रमुख अनुप वारंग यांनी दिली.