किरकोळ वादाने गाठले टोक | पतीने पत्नीला पाठविले यमलोक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 19, 2024 12:57 PM
views 715  views

देवगड : देवगड येथील महाळुंगे धनगरवाडी येथे आज १९ एप्रिलला दुपारी साडे अकराच्या सुमारास पती - पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होऊन पतीने पत्नीचा खून केला आहे. 

ही खळबळ जनक घटना आज दुपारी साडे अकराच्या सुमारास घडली पत्नी सुप्रिया सुनिल पेडणेकर वय 50 व पती सुनील सदानंद पेडणेकर वय 58 यांच्यात  किरकोळ कारणातून वाद होऊन कडाक्याचे भांडण झाले. त्याच रागात पतीने सुरीने पत्नीच्या छातीत खुपसले यात तिचा जागीच मृत्यू झाला.