सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत होत आहे. मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले आहेत. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दहा वर्ष शिवसेनेचे आमदार इथे कार्यरत आहेत. याच गांधी चौकात आम्ही त्यांची जबाबदारी घेतली होती आज त्याची खंत वाटते. पण, ही खंत आता दुर करायला हवी. आगामी निवडणुकीत येणारा खासदार व आमदार हा उद्धव ठाकरेंच्या विचारांचा विजयी करुन आणू असं विधान बाबुराव धुरी यांनी केल. लोकशाही, संविधान भाजपचे लोक मानत नाही. यांना हद्दपार करायची वेळ आता आली आहे. महाविकास आघाडीचे लोक आजच्या सभेत आले आहेत. हा परिवर्तनचा संदेश आहे. उडाले ते कावळे राहीले ते मावळे हा संदेश आज उद्धव ठाकरेंना देऊन त्यांचे हात अधिक बळकट करू असं मत बाबुराव धुरी यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, जान्हवी सावंत, सतिश सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, सुशांत नाईक, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.