देवगड : तळवडे खडवी येथील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असून, त्या ठिकाणी संरक्षण कठडा व रस्ता रुंदीकरण तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी उपअभियंता सार्व. बांधकाम विभाग देवगड यांच्या जवळ लेखी निवेदनाद्वारे भाकरवाडी युवक क्लब च्या वतीने पत्र देऊन करण्यात आले आहे.
वरेरी तळेबाजार वानिवडे रेडेटाका प्र. जि. मा.12 वरील तळेबाजार पासून 3 कि.मी अंतरावरील तीव्र उताऱ्याच्या वळणावर खडवी येथे गेल्या ऑक्टॉबर महिन्यात तीन अपघात होऊन शाळकरी मुले व ग्रामस्थ यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तसेच गेली कित्येक वर्षे अनेक अपघात या जागेवर होत असून,पदचारी तसेच वाहन चालक जखमी देखील झाले आहेत. त्यामुळे या तीव्र उताऱ्याच्या रस्त्याचे रुंदीकरण व दोन्ही वळणावर संरक्षक कठडा बांधावा अशी मागणी उप अभियंता सार्व. बांधकाम विभाग देवगड यांचेजवळ लेखी निवेदना द्वारे भाकरवाडी युवक क्लब च्या वतीने अध्यक्ष प्रसाद दुखंडे यांनी केली आहे.
तातडीने या मार्गांवर कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करू असा लेखी निवेदनाद्वारे इशारा ही या वेळी बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.