सावंतवाडी : आठवडा बाजारावरून राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. यात आठवडा बाजार नाहीसा होणार असून याचा परिणाम बाजारपेठेवर होणार आहे. आठवडा बाजार हा जनतेचा प्रश्न असल्याने सर्वपक्षीयांनी एकत्रीत येत यावर सुवर्णमध्य काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केल आहे.
आठवडा बाजार हा बाजाराच्या ठिकाणीच असावा, लोकांंना सोयीस्कर ठरेल, अशा पद्धतीने तो भरला जावा. चार ठिकाणी बाजार भरवून त्याचा बाजार करू नये, असं मत पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अँड. सायली दुभाषी, सावली पाटकर, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, अशोक पवार आदी उपस्थित होते.