...म्हणून वैभव नाईक यांच्या उरात धडकी भरली : धोंडी चिंदरकर

Edited by:
Published on: August 16, 2023 15:49 PM
views 727  views

मालवण : मुंबई गोवा महामार्ग गतिमान पद्धतीने 1लेन सुरू असून रविंद्र स्वतः जातीने लक्ष घालून चतुर्थीपूर्वी एक लेन रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे सर्वजण एकमेकांशी संपर्क करून या कामात गतीमानता यावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्याशी सातत्यानं चर्चा करत आहेत. परंतु हा एकोपा पाहून वैभव नाईक यांच्या उरात धडकी भरली असून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत अशी टिका भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहे. 

 

चिंदरकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांना आता आपल्या भविष्याची चिंता लागली आहे. भाजपाची सर्व नेते मंडळी या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहेत. हा एकसंघ एकोपा पाहून वैभव नाईक यांच्या उरात धडकी भरली आहे. ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि नारायणर राणे हे त्यांच्या पक्ष प्रवेशाची मोठी अडचण ठरत असल्याने ते भा ज प मध्ये आलबेल नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कपोकल्पित उभ्या राहिलेल्या बुरुजाची एक एक वीट दररोज निलेश राणे तोडून फोडून टाकत असल्यानेच हि असबंध बडबड. पण यातून कोणीही विचलित होणार नाहीत उलट अधिक जोमाने शत प्रतिशत भा ज प करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे याची नोंद आमदारांनी घ्यावी असा टोलाही चिंदरकर यांनी लगावला.