आम्ही फक्त झेंडे उचलायचे का ? | अमित सामंत यांचा ठाकरे सेनेवर 'बाण'

सावंतवाडीवर केला राष्ट्रवादीनं दावा
Edited by: विनायक गावस
Published on: October 13, 2023 15:04 PM
views 741  views

सावंतवाडी : जिल्ह्यात महाविकास आघाडीत सगळंच शिवसेना ठाकरे गटाला हवं असेल तर आम्ही फक्त झेंडे लावायला आलोत का ? अस विधानं करत सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला पाहिजे अशी मागणी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली. तर आम्हाला ही जागा सुटलीच पाहिजे, आम्ही कुणाची चाकरी करणार नाही. विनायक राऊत यांना पुन्हा खासदार व्हायच असेल तर राष्ट्रवादीची मत पण लागतील अस मत अमित सामंत यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, माहविकास आघाडीत राहून जर शिवेसना सर्व निवडणुकीत जर जास्त जागा मागत असेल तर आम्ही काय चाकरी करायला आणि झेंडे लावायलाच आलोत का ? असा सवाल  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला.दरम्यान विनायक राऊत यांना पुन्हा खासदार व्हायचं असेल तर त्यांनी राष्ट्रवादीला देखील युतीत राहून समान वाटा दिली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे. आमच्या उमेदवार या अर्चना घारे-परब असतील, बाळासाहेब पाटीलच आमचे वरिष्ठ आहेत त्यामुळे त्यांनी ते जाहीर करावं अस मत व्यक्त केले. सावंतवाडी येथील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.