वारकऱ्यांवर लाठी हल्ला प्रकरणी शिवसेना आक्रमक

Edited by:
Published on: June 12, 2023 20:41 PM
views 99  views

कणकवली : श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, वारकऱ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या शिंदे फडणीस सरकारचा निषेध करत असल्याचे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांना निवेदन देण्यात आले.

वारकऱ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या शिंदे फडणीस सरकारचा निषेध असो.. यासह विविध घोषणा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. कणकवली येथील तहसीलदार कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत,युवा नेते संदेश पारकर,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, मजदूर संघ संचालक जयेश धुमाळे, राजू राणे, सचिन सावंत, माजी सरपंच रुपेश आमडोस्कर, महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे, युवा सेना समन्वयक तेजस राणे, सरपंच आनंद ठाकूर, वैभव मालांडकर, ललित घाडीगावकर, विलास गुडेकर, सचिन आचरेकर, निसार शेख, आरपीआयचे तानाजी कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, सिद्धेश राणे, प्रसाद अंधारी, अनुप वारंग, सुदाम तेली, रोहित राणे, प्रवीण वरुणकर, सचिन खोचरे, दिव्या साळगावकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.या आंदाेलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनेकांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती.

शिवसेना आ.वैभव नाईक म्हणाले, वारकरी वारीला हजारो वर्षांची प्रथा परंपरा आहे.आषाढी वारीला दरवर्षी लाखो लोक जात असतात,मात्र शुल्लक कारणावरुन वारकरी संप्रदायाच्या लोकांवर लाठीमार करण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केले आहे .आम्ही शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो. राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार येणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत म्हणाले, वारकऱ्यांवर जो लाठी हल्ला शिंदे फडणवीस सरकारने केला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. एक वर्षापूर्वी शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांवर ,वारकऱ्यांवर व सर्वसामान्य जनतेवर अन्याय सुरू आहे. इतिहासात वारकऱ्यांवर लाठी हल्ला झालेला आहे. एकीकडे हिंदुत्वाचे सरकार आले,म्हणून सांगायचे आणि दुसरीकडे माऊलीच्या भक्तांवर लाठी हल्ला करण्याचा प्रकार करायचा, भविष्यात या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. युवा नेते संदेश पारकर म्हणाले, महाराष्ट्र शिंदे फडणवीस सरकारकडून जो अन्याय अत्याचार सर्वसामान्यांवर सुरू केला आहे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वारकऱ्यांवर लाठीमार झालेला आहे.

एका बाजूने हिंदुत्वाची मते मागायची आणि दुसरीकडे अत्याचार शिंदे फडणवीस करायचा. गेल्या वर्षभरात प्रत्येक घटकावर अन्याय करण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केले.आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे .वारकरी संप्रदायाचा अपमान केल्याबद्दल आम्ही सरकारचा निषेध करतो, जनतेने या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची काम करावे असही म्हणाले.