आलॅ इंडिया कुराश स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १३ खेळाडूंची निवड..!

Edited by: भगवान शेलटे
Published on: October 19, 2023 14:28 PM
views 90  views

सिंधुदुर्ग : उत्तर प्रदेश इथं होणाऱ्या आलॅ इंडिया कुराश स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. इंदोर इथं राज्यस्तरीय स्पर्धा खेळून तब्बल १३ सुवर्णपदकांची कामगिरी करत पुढील उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी १३ खेळाडूंची निवड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून झाली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा कुराश  महासंघच्या  १३ खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत २०, २१, २२ ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. 

या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक (कोच) म्हणून श्री वसंत जाधव तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून दिनेश जाधव यांचे मार्गदशन लाभले. या सर्व खेळाडूंवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.