
सावंतवाडी : संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने शनिवार २६ जुलै २०२५ रोजी दुपारी २ ते ६ यावेळात महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात शासन, प्रशासनाच्या उपस्थित हा मेळावा होणार आहे. समाजबांधवांनी आपल्या समस्या लिखीत स्वरुपात घेऊन याव्यात असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हाध्यक्ष परूळेकर म्हणाले, अनुसूचित जातीतील लोकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. बौद्ध व अबौद्ध समाजाचे हे प्रश्न प्रशासनाकडून सुटत नाहीत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांची आम्ही भेट घेतली होती. हे प्रश्न त्यांच्या सुचनानंतर सुटू शकतात. त्यामुळे त्यांच्या जनता दरबाराप्रमाणे शनिवारी २६ जुलै रोजी समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा होणार आहे. पालकमंत्री राणे यांनी यासाठी आम्हाला वेळ दिला, त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो समाजबांधवांनी आपल्या समस्या लिखीत स्वरुपात घेऊन यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्मशानभूमी, जातीवाचक गावांची नाव बदलणे, समाजमंदिर उभारण्यासाठी निधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जिल्हा स्तरावर व्हावं आदी अशी मागण्या यावेळी करणार आहोत.
यावेळी कार्याध्यक्ष रमाकांत जाधव म्हणाले, समाजहीत हा संघटनेचा मुख्य हेतू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महामंत्र जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एका झेंड्याखाली एकत्र येण्याचा आम्ही निर्णय घेतला असून संविधानिक हितकरिणी महासंघाची संकल्पना पुढे आली आहे. जिल्ह्यात आमचं मजबूत संघटन निर्माण झालं आहे असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी संविधानिक हितकरिणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा संघटक अंकुश जाधव, महासचिव गौतम खुडकर, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, वासुदेव जाधव, शंकर जाधव, सत्यवान तेंडोलकर, विनोद कदम, मंगेश गांवकर, मधुकर जाधव आदी उपस्थित होते.