
सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाच्यावतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना शहरातील उपयोजनेबाबत निवेदन देण्यात आले. यात सावंतवाडी शहरात दोन दिवसापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी पोलीस खात्याने तातडीचे उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत निवेदन दिले.
तसेच चोरीच्या घटनेत चोरट्यांकडे हत्यारे आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे. कारण, विरोध झाल्यास त्यांनी हल्ला केला असता. सावंतवाडी हे शांत संस्कृत आणि समृद्ध राजकीय वारसा असलेले शहर आहे. अशा घटनांमुळे शहराच्या प्रतीमेला काळीमा फासला जात आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी शहराच्या सर्व सीमा मुख्य चौक दाट वस्ती आणि सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. रात्री 12 ते 6 सहा या कालावधीत प्रत्येक तासाला पोलिसांची गस्त व्हावी, सर्व परप्रांतीय कामगार आणि भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंदणी अनिवार्य करावी. संशयस्पद हालचाली किंवा गैरप्रकार आढळल्यास नागरिकांना विशेषतः जेष्ठ नागरिकांना त्वरित संपर्क साधता यावा यासाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध करून तो प्रत्येक घरात उपलब्ध करावा अथवा चौकाचौकात प्रसिद्धी फलक लावण्यात यावेत. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व नागरिकांना सुरक्षा उपायांची माहिती देण्यासाठी वेळोवेळी जागरूकता सभा घ्याव्यात आणि संभाव्य घटनांमध्ये खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. सावंतवाडी शहरातील लॉजिंगमध्ये उतरणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवण्याबाबत व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याबाबत पोलीस स्टेशनची त्वरित संपर्क साधण्याचा सूचना लॉजिंग, हॉटेल मालकांना देण्यात याव्यात. ही उपायोजना त्वरित अंमलबजावणी करून शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेची रक्षण व्हावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख शैलेश गौंडळकर, शहर संघटक निशांत तोरसकर, शहर प्रवक्ते आशिष सुभेदार महिला शहर संघटक सौ समीरा खलील, उपशहर प्रमुख शेखर सुभेदार, शाखा प्रमुख अमोल सारंग, जावेद शहा आदी उपस्थित होते.