सावंतवाडी : संत गाडगेबाबा मंडीईच नुतनीकरण होणार असल्यानं इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या मागील बाजूस मंडईतील व्यापाऱ्यांच स्थलांतर करण्यात आले आहे. अवकाळी पावसासह व्यापारी वर्गाला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांकडे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच व्यापारी वर्गान लक्ष वेधल.
मंडईतील उर्वरित व्यापारी याठिकाणी स्थलांतरीत होणार असल्यानं त्याबाबत देखील शंका व्यापारी वर्गान उपस्थित केली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना समक्ष बोलावून घेत व्यापारी वर्गाच्या समस्या मांडल्या. यावेळी मुख्याधिकारी यांनी समस्यांवर कार्यवाहीची ग्वाही दिली असून व्यापारी वर्गाच्या समस्यावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली.