वैभववाडी : करूळ भट्टीवाडी येथील रहिवासी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम सिताराम कदम (गुरुजी) वय ८५ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मयत कदम गुरुजी यांनी तालुक्यात वैभववाडी, गडमठ, नाधवडे व अन्य ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. येथील तालुका स्कूलमध्ये ते उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. शांत व संयमी व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. सोमवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वैभववाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी मयत दत्ताराम कदम यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना, भाऊ व नातवंडे असा मोठा परिवार आहे.