LIVE UPDATES

आंबोलीतील पर्जन्यमान मोजणी यंत्र कुचकामी

दत्तू नार्वेकर यांनी वेधलं आ. केसरकरांचं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2025 17:16 PM
views 60  views

सावंतवाडी : जागतिक महत्वाचे पावसाचे ठिकाण असून  प्रशासनाने पाऊस मोजणीचे यंत्र आणि जागा याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर बसवलेले पाऊस मोजणी यंत्र काढून ते पारंपरिक पद्धतीने पूर्वीप्रमाणे मोजणी करावी ही जागा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शेजारी २० गुंठे जागा ग्रामपंचायतीची आहे त्याठिकाणी ते बसवावे अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे आपण केली आहे अशी माहिती आंबोली उप सरपंच दत्तू नार्वेकर यांनी दिली आहे.       


जगात सर्वाधीक पावसाच्या टॉप थ्री मध्ये आंबोली चा सहभाग आहे. तर २०१९ मध्ये आंबोली मौसिमराम पेक्षा पावसाच्या आकडेवारीत पुढे होती हे जागतिक रेकॉर्ड झाले होते. गेली अनेक वर्षे ब्रिटिश काळापासून आंबोली मध्ये पाऊस मोजमाप होते. पूर्वी नाथ जोशी करायचे मग भाऊ ओगले हे ४० वर्षे काम करीत आहेत. असे असताना गेल्यावर्षी डिजिटलं च्या नावाखाली ग्रामपंचायत च्या छतावर बसवलेल यंत्र हे कुचकामी आहे. एवढ्याशा सौर ऊर्जेवर हे यंत्र २४ तास चालू शकत नाही.अधिकारी बोगस सांगत आहेत.आंबोलीत धुक्यात आणि सतत पावसात मोठे सौर पॅनल चालत नाही. बरेचदा लाईट ३-४ दिवस नसते. अशा वेळी जीपीएस वरून हे रोकॉर्ड मिळत नाही हा फोल पणा आहे.त्यामुळे गेल्या वर्षी रेकॉर्ड बरोबर झाले नाही. पावसाचे रेकॉर्ड आणि नुकसान भरपाई हा महसूल चा विषय असतो.त्यामुळे ग्राम पंचायत कडे रेकॉर्ड मिळेल कसे.ते यंत्र चालू की बंद हे समजणार कसे? अधिकाऱ्यांनी १ जुन ला च विचारविनिमय करणे आवश्यक असताना तसे काही केले नाही.त्यामुळे तात्काळ येथील यंत्र काढून पुन्हा  जिल्हा बँके शेजारी २० गुंठे जागा आहे त्याठिकाणी बसवावे. पुन्हा पारंपरिक मोजणी करावी.स्थानिक वातावरणाची परिस्थीची माहिती कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी करू नये. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी दत्तू नार्वेकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

तसेच आंबोलीत गाळ हा विषय अनेकदा शासनाकडे आपण यापूर्वी देखील प्रस्ताव पाठवले आहेत. ते प्रस्ताव रोजगार हमी योजनेअंतर्गत पाठवले आहेत.वायंगणी शेती ही मालकी तसेच खोती पद्धत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळावा.वन्य प्राण्यामुळे शेती संपली त्यामुळे गाळ भरला. आंबोलीत पूर परिस्थिती कधीच नाही.मात्र पिण्याचे पाणी आणि जल संधारणासाठी नदी क्षेत्र टिकण्यासाठी गाळ काढण्याची मागणी आपण यापूर्वी केली आहे.