
सिंधुदुर्ग : एखाद्याने रॅगिंग केले असेल. तर त्याला तत्काळ कॉलेजमधून बाहेर काढले जाऊ शकते. तसेच कोणत्याही कॉलेजमध्ये पाच वर्षाकरिता प्रवेश मिळणार नाही. त्याचप्रमाणे दोन वर्षाची न्यायालयीन कोठडी, दहा हजार रुपये दंड घेण्याची तरतूद कायद्यात आहे. आणि कोणत्याही शासकीय सेवेत कधीही नोकरी मिळताना अडचणी येतील अशा प्रकारे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग अवधूत देशिंगकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग अवधूत देशिंगकर यांच्या उपस्थितीत अॅटी रॅगिंग बद्दल जन जागृती हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी सौ. नेहा पाल, खजिनदार सौ. वृशाली कदम तसेच संस्थेचे विश्वस्त केतन कदम, प्राचार्य डॉ. एस व्हि. ढणाल, ऍड. श्वेता तेंडुलकर, लोक अभिरक्षक सिंधुदुर्ग लिपिक श्वेता सावंत, डिप्लोमाचे प्राचार्य विशाल कुशे, उपप्राचार्य पूनम कदम, प्रशासकीय अधिकारी राकेश पाल तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश अवधूत देशिंगकर यांनी रॅगिंग किती हानिकारक आहे. तसेच त्याचे होणारे परिणाम संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना देऊन रॅगिंग विषयाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यामुळे विद्यार्थ्यानच्या मानसिकतेवर आणि समाजावर होणारे परिणामाची गंभीरता याची जाणीव करून दिली. रॅगिंगचा त्रास झाला तर तक्रार कोणाकडे करायची तसेच त्या रॅगिंग संदर्भात चौकशी करून त्यावर कशाप्रकारे कारवाई केली जाते. या संदर्भात देखील त्यांनी सांगितले. ही केलेली कारवाई जर सत्य असेल तर कशाप्रकारे दंडात्मक कारवाई केली जाते. याचे देखील गांभीर्य त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जर एखाद्याने रॅगिंग केले असेल. तर त्याला तत्काळ कॉलेजमधून बाहेर काढले जाऊ शकते. तसेच कोणत्याही कॉलेजमध्ये पाच वर्षाकरिता ऍडमिशन मिळणार नाही. त्याचप्रमाणे दोन वर्षाची न्यायालयीन कोठडी ही शिक्षा, दहा हजार रुपये दंड घेण्याची तरतूद कायद्यात आहे. आणि कोणत्याही शासकीय सेवेत कधीही नोकरी मिळताना अडचणी येतील अशा प्रकारे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच एखाद्या विद्यार्थ्यास भारतीय नागरि दंड संहिता मार्फत देखील योग्य त्या पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे कोर्टात देखील दाद मागता येऊ शकते. रॅगिंग हे जिथे शिक्षण घेतले जाते त्या ठिकाणी सर्वात जास्त केले जाते कुठेही रॅगिंग झाले तरी तुम्हाला न्याय मागणे सोपे आहे. आता कायदा तुमच्या बाजूने आहे. दुर्बलासाठी हा कायदा ठामपणे उभा आहे असे ते म्हणाले. त्याचबरोबर जाता जाता त्यांनी विद्यार्थ्यांना नियमाचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारे रोड अपघात व त्याचे परिणाम यांची देखील माहिती दिली. आयुष्य खूप सुंदर आहे. ते चांगल्या पद्धतीने जगण्याचा सल्ला दिला. तसेचं महाविद्यालयाचा परिसर व विद्यार्थ्याच्या गुणांचे कौतुक केले.
यावेळी एम.आय.टी.एम चे प्राचार्य डॉ. एस व्हि. ढणाल यांनी न्यायाधीश अवधूत देशिंगकर यांचे सर्वप्रथम आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या माहितीचे कसे आचरणात आणता येतील याबाबत मार्गदर्शन केले.










