LIVE UPDATES

प्रवासी बोट वाहतूक सेवा रेडी बंदरापर्यंत करावी

मंगेश तळवणेकर यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2025 16:56 PM
views 109  views

सावंतवाडी : कोकणवासियांच्या सेवेसाठी लवकरच सुरू करण्यात येणारी भाऊचा धक्का ते रत्नागिरी विजयदुर्ग मालवण अशी जलद गतीची प्रवासी बोट वाहतूक सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

श्री. तळवणेकर यांनी यासंदर्भात निवेदन मंत्री राणे यांना दिले असून त्यात असे म्हटले की, सुरू करण्यात येणाऱ्या प्रवासी बोट वाहतूक सभेमुळे निश्चितच कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे तसेच रोजगारही उपलब्ध होणार आहे या सेवेमुळे कोकणवासीय पाच तासात मालवण येथे पोहोचणार आहेत. खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे परंतु ही सेवा केवळ मालवण पर्यंत सुरू न करता ती पुढे रेडी बंदरापर्यंत विस्तारित करण्यात यावी जेणेकरून याचा लाभ रेडी वेंगुरला शिरोडा मोचेमाड सातार्डा सातोसे, आरोंदा या दशक्रोशीला होणार आहे. सद्यस्थितीत या दोषयकोशीमध्ये असलेल्या ग्रामस्थांना रेल्वे प्रवासासाठी सावंतवाडी रोड मळगाव येथे यावे लागते तर राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी मळगाव अगर बांदा येथे यावे लागते तर विमान सेवेसाठी मोपा,वास्को दापोली, चिपी येथे जावे लागते.

प्रवासी बोट सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित केल्यास या दशक कृषीतील जनतेचा प्रवास सुलभ व जलद होणार आहे तसेच पर्यटन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे रेडी हे सज्ज बंदर असून या दशक्रोशीत गतवैभव प्राप्त होणार असून कोकण वासियांचे प्रवासी जलवाहतुकीचे पन्नास वर्षाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे यामुळे रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा व प्रवासी ताण कमी होणार आहे. तरी या मागणीचा आपण विचार करावा असे विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.