सावंतवाडी : सालईवाडा येथील सुरु असलेलं गटाराच काम राष्ट्रवादी काँग्रेसनं बंद पाडल. हे काम निकृष्ट दर्जाचे असून यात वापरली जाणारी वाळू ही हीन दर्जाची आहे. वाळू कमी अन दगड जास्त अशा परिस्थितीत काम सुरू आहे. दिवसाढवळ्या न.प. अधिकाऱ्यांच्या समोर लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. बोगस बांधकाम करून फसवणूक केली जात आहे. निकृष्ट दर्जाचे हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन बंद पाडलं आहे. जोपर्यंत चांगल्या दर्जाच मटेरियल वापरल जात नाही तोपर्यंत हे काम करू देणार नाही. तसेच योग्य दर्जाच काम होत नाही तोवर कॉन्ट्रॅक्टरच बील अदा करण्यात येवू नये अशी मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. दरम्यान, शहरातील अनेक समस्यांकडे न.प. प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. लोकांच्या समस्यांकडे लक्ष न दिल्यास व अशाप्रकारे मनमानी कारभार चालू ठेवत बोगस काम केल्यास न.प. अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा देत निकृष्ट दर्जाच काम बंद पाडल. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, बावतीस फर्नांडिस, आशिष कदम, इफ्तेकार राजगुरू, अशोक पवार, आगस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.