सिंधुदुर्ग : नारायण राणेंच्या उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी भाजपला एवढा वेळ लागला. वर्गात पहील्या बॅन्च वर बसणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या बाकावर बसवलं. तेराव्या यादीत राणेंची उमेदवारी घोषित केली. किरण सामंत यांनी राणेंना शेवटच्या बाकावर बसवल. त्यामुळे राणेंची पात्रता भाजप व महायुतीत केवढी आहे. हे लोकांनी ओळखल आहे. या मतदारसंघात राणेंचा पराभव करून विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा शिवसेना उबाठाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.