कणकवली : शहरातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समधील एका मोबाईल शॉपीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा सुरु केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही.
आग लागले हे कळतात संजय मालकर यांनी ताबडतोब उपस्थित राहून नगरपंचायत ला फोन केला व सर्व कणकवलीतील नागरिकांना कळवले लगेचच नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र शॉप मधील मोबाईल व साहित्य जळून खाक झाली असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, अण्णा कोदे, संतोष पुजारे, चेतन अंधारी, शेखर राणे, दत्ता शंकरदास, गणेश काटकर, संजय राणे, राजू पारकर, शेखर गणपत्ये, आबा माणगावकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले होते.