
सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील सात दिवस गजबजलेल्या धालोत्सवाची शेवटची रात्र सोमवारी संपन्न झाली. लोककला टिकवल्याबरोबरच त्यांच्या प्रसाराचेही कार्य नकळत करणाऱ्या या उत्सवाची गोडी महिलांच्या प्रचंड सहभागाने व्दिगुणीत झाली. माजगाव म्हालटकरवाडचातील महादेवाचे देवस्थान हे उत्सवाचे केंद्रस्थान असते. यावर्षी माजगाव महालकरच पालोत्सव मंगळवारी दि. ३ जानेवारी रोजी सुरु झाला होता. आठ दिवसांनी १० जानेवारीला दुपारी १२ वाजता त्याची सांगता झाली. सात दिवस चालणाऱ्या धालोत्सवात महिलांना सात रात्री ओव्या, लोकगिते, फुगडया असे पारंपारिक कार्यक्रम करून नंतर सर्व महिला माठावर एकत्र चहा-पाण्याचा कार्यक्रमात मनसोक्त एकमेकांशी संवाद साधतात. सहाव्या रात्रीचे वैशिष्ट्य म्हणजेतील पुरुष कासाराची भूमिका करून मांडावर जमलेल्या सर्व स्त्रियांना आंब्याच्या पानाच्या बांगडया मरतो.
सातवी रात्र सहाही रात्रीपेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असतेतसेच ही रात्र पूर्ण जागवली जाते. रात्री दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होते. स्त्रियांतील दोघी पती-पत्नी वेशभूषा करतात. त्यांची वाजत गाजत वरात काढली जाते. नवरा देवघरातून सुन लग्नासाठी वाडयातून वरातीसह येतो व तुळशीकडे येऊन दानोशाला बसतो.
तिथून ती मांडावर येतो. यावेळी फुगडया, गाणी आदी कार्यक्रम होतात. हा सगळा कार्यक्रम सकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतो. पहाटे त्यातीलय एक स्त्री पिंगळीची भूमिका करते व सर्व घरे फिरते. त्यावेळी तिला घराघरातून पैसे दिले जातात. कार्यक्रम येथे संपतो. आठव्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परत पांगलेली माणसे व स्त्रिया मांडावर जमतात. या दिवशी कार्यक्रमाची सांगता असल्याने गावातील सर्व लोक या कार्यक्रमाला जमतात. त्यावेळी नवस बोलण्याचा कार्यक्रम होतो. प्रथम नाचणाऱ्या स्त्रियांवर शिवकळा उभ्या राहतात व ज्या स्त्रिला मुल नसते ती विहीरीवर स्नान करून पांढरी साडी नेसून ओलल्यानेच मांडावर येते. मांडावरील शेणाच्या तुळशीत शिवकळाच्या मदतीने सोबत आणलेले हळद व दुधाचे मिश्रण ओतते. त्यावेळी ओव्या म्हणतात
तिला आधार देणाऱ्या स्त्रिया आशिर्वाद देतात. त्यांचा आशिर्वाद घेऊन ती घरी जाते व साडी बदलून येते. आशिर्वाद देणाऱ्या स्त्रिया तिच्या ओटीत नारळ घालतात. त्याचे खोबरे फक्त त्या पती-पत्नीनेच खावे अशी अट असते, पुन्हा त्या स्त्रीला अंधार आशिर्वाद देतात. त्यानंतर अंधार उभे राहणाऱ्या स्त्रियांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होतो व दुपारी बारा वाजता या सर्व स्त्रियांच्या जागरणाची समाप्ती होऊन कार्यक्रम संपतो. स्त्रियांना हुरहूर लावत सात दिवसांच्या गजबजलेल्या रात्रीची सांगता होते.