देवगड : लंपी रोगामुळे महाळुंगे गावात गेल्या पंधरा दिवसात तीन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पशू वैद्यकिय विभगाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. आज तिसरा बळी गेला असून विष्णू राणे यांचा बैल मरण पावलाय. त्यांचे जवळपास २५००० रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.