सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलमाफीसाठी सर्वांनी एकत्र येवुन लढा देवुया

विविध संघटनांच्या बैठकीत समिती करण्यात आली गठीत | समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सतीश लळीत यांची निवड
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 10, 2022 17:10 PM
views 169  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलमाफी होण्यासाठी सर्वांनी एकत्र येवुन लढा देवुया, हा लढ्याची व्याप्ती वाढवुया असा निर्णय कुडाळ येथे व्यापारी महासंघाच्या वतीने टोलमाफी संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध संघटनेच्या वतीने तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी घेतला. तसेच या संदर्भात लढा देण्यासाठी जिल्हास्तरीय अस्थायी समिती गठीत करण्याचा निर्णय घेवुन याच्या जिल्हाध्यक्षपदी सतीश लळीत यांची निवड करण्यात आली.

कुडाळ वासुदेवानंद सरस्वती सभागृहात ही बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, कोल्हापूर टोलमुक्त समितीचे गिरीश फोंडे, जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, सतीश लळीत, एमआयडी असो.चे राजन नाईक, शिवाजी घोगळे, संजय भोगटे, पी. डी. शिरसाट, गिरीश फोंडें, संजय भोगटे, ईर्शाद शेख, हेमंत मराठे, तसेच जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी प्रसाद पारकर यांनी सांगितले की, राज्यात त्यावेळी सुरू झालेले टोल गेली कित्येक वर्षे झाली तरी बंद केले नाहीत. टोल हा प्रत्येकाच्या माथी मारण्याचे काम सरकार करीत आहेत, सर्व प्रकारचा कर घेणारे सरकार घेते, टोल ही घेते, अशी खंत व्यक्त केली. सर्वांनी टोलमाफीसाठी सर्वांनी एकत्रित येवुन लढा देवुया, असे सांगितले. 

यावेळी गिरीश फोंडे, टोलमाफी आंदोलनाची व्युहरचना करणे आवश्यक आहे. सरकार पहिल्यांदा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. आपण सर्वांनी एकत्रित ताकद लावूया. समाजातील वेगवेगळ्या संघटनांचे आंदोलन उभं करणं आवश्यक आहे. शासन कर पण घेणार आणि सुविधा देण्यात येणार नाही हे योग्य नाही. आदोलनाची खोली आणि व्याप्ती वाढली पाहिजे, त्यासाठी तरुण मुलांचा सहभाग करून घ्या. तुमच्या आंदोलनात आमचा सहभाग निश्चित आहे असे आश्वासन देत सर्व ग्रामसभा ठराव घ्या की हा टोल आम्हाला नको, न्यायालयीन लढ्यावर विसंबून राहु नका, आंदोलनावरच भर द्या.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले की, एका बाजुने, न्यायालयीन, दुसर्या बाजुने रस्त्यावरील लढा देताना सर्व गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. टोलमाफी होण्यासाठी विविध मार्ग काढले पाहीजेत तरच टोलमाफी होईल, हा महामार्ग 60 टक्के ठेकेदार व 40 टक्के सरकारचा खर्च असा आहे. टोलमाफी होण्यासाठीलढ्याची व्याप्ती सर्व स्तरातून वाढणे गरजेचे आहे. मी त्यावेळी रस्ता दर्जेदार होत नाही या बाबत आवाज उठविला, कोणी साथ दिली? न्यायालयाने 10 लाख भरायला सांगितल्या नंतर मी थांबलो. महामार्गाची अनेक कामे प्रलंबित आहेत. कणकवली ब्रीज, बाॅक्सवेल अशी अनेक कामे अपुर्ण आहेत. शेवटचा पर्याय एकच आहे, राज्य सरकारकडे सर्वांनी जावु, राज्याचे बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पर्यायी मार्ग द्यावा ही मागणी राज्य सरकार कडे करणे गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यापुरती पहीला विचार करा. पुण्याच्या मार्गावरून येताना व या महामार्गावरून येतानाचा फरक किती आहे ते बघा. टोलमाफी ही जिल्ह्यातील जनतेसाठी गरजेचे आहे, त्यासाठी चा हा लढा पक्ष विरहीत होवुन जिल्ह्यातील नागरीक म्हणून हा लढा होणे गरजेचे आहे असे सांगितले. 

ट्रक मोटर मालक चालक संघटनेचे अध्यक्ष राजन बोभाटे यांनी सांगितले की, टोलमाफी संदर्भात न्यायालयात लढा देण्यासाठी लागणार्या आर्थिक खर्चासाठी सुमारे एक लाख रूपयाचा निधी आम्ही आमच्या संघटने कडुन देवु असे सांगितले. या लढ्यात निश्चितच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी बार असोसिएशनचे अॅड.राजीव बिले, जिल्हा काॅग्रेस संघटना अध्यक्ष इर्शाद शेख, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे शिवाजी घोगळे, सतिश लळीत, राजन बोबाटे, कंझ्यूमर डिस्टीब्युटर संघटना राजन नाईक, नर्सरी संघटना आदि संघटनाच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला.

यावेळी जिल्हास्तरीय अस्थायी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या समितीच्या अध्यक्षपदी सतीश लळीत यांची निवड करण्यात आली. तसेच मुंबई, दिल्ली मंत्रालय व कोल्हापूर या तीन ठिकाणी संपर्कात राहण्यासाठी तीन समित्या बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.