
सावंतवाडी : शिक्षक भारतीच्यावतीन दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांना प्रदान करण्यात आला. बालिका दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाहक संजय वेतुरेकर आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरित करण्यात आला.
प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी ३३ वर्षे संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे ज्ञानदानाचे व्रत जोपासत मराठी विषयाचे अध्यापन केले. मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. प्रभावी अध्यापनातून महाविद्यालयीन युवकांच्या जाणीवा समृद्ध करताना स्वतःच्याही उत्कट भावना शब्दबद्ध करत त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. तुटले पण पुन्हा बांधून घेताना हा कवितासंग्रह, ओळ अनमोल हे संपादन, विविध नियतकालिकांमधून केलेले समीक्षा लेखन, ललितलेखन, पुस्तक परीक्षणे या माध्यमातून साहित्य चळवळीमध्ये त्यांचा क्रियाशील सहभाग राहिला आहे. प्राध्यापिका म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतानाच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सिंधुदुर्ग साहित्य संघ, नवाक्षर दर्शन नियतकालिकाचे संपादक मंडळ अशा साहित्य विश्वामध्ये योगदान संस्थांच्या मोलाचे देणाऱ्या त्या क्रियाशील सदस्य आहेत. मातृभाषा मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयोजित अनेक चर्चासत्रे, आकाशवाणी कार्यक्रम, काव्य मैफिली यामध्ये त्यांचा सातत्याने अभ्यासपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यांच्या कवितांचा समावेश अभ्यासक्रमात करून मुंबई विद्यापीठाने त्यांचे साहित्यमूल्य अधोरेखित केले आहे. शिक्षक भारतीने त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि अभिमानास्पद कामगिरीची दाखल घेत त्यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. यावेळी साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, महिला आघाडी प्रमुख सौ. सुस्मिता चव्हाण, दीपक तारी, अनिकेत वेतुरेकर, माणिक पवार, सौ.शारदा गावडे, डॉ.सुमेधा नाईक, सिद्धार्थ तांबे, संतोष वैज, मोहन पालेकर, अरविंद मेस्त्री, रमेश गावडे ,परमेश्वर सावळे , प्रदीप देसाई, श्री. टिळवे, अभिषेक कशेळीकर, पवन वणवे, दशरथ सांगळे, श्री. कदम, विद्यानंद पिळणकर, गोपाळ गवस, भिवा धुरी, राजाराम पवार, सौ. दीप वारंग, सौ. रूपा कामत, सिद्दीकी मुलानी, विजय ठाकर, देऊ साईल, दत्ताराम नाईक, सुशांत नाईक, आनंद कदम, दिलीप गाडेकर, महेश पास्ते, विठोबा कडव, नितिन माने, कुमारी अनन्या वेतुरेकर, कुमारी तीर्था आडेलकर आदी उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. सुस्मिता चव्हाण यांनी केले.