कणकवली बाजारपेठेतील 'तो' चर बुजवला

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घातलं वैयक्तिक लक्ष
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 09, 2025 09:24 AM
views 130  views

कणकवली : गेले सलग दोन दिवस कणकवली बाजारपेठेत सातत्याने नगरपंचायतने नळ योजना दुरुस्तीसाठी खोदलेल्या चरात वाहने रुतल्याची घटना घडत होती. याबाबत दै. कोकणसाद व कोकणसाद लाईव्ह चॅनेलच्या  बातमीची   दखल घेऊन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चाने सदरचा चर बुजवला. नलावडे यांच्या या कार्याचे, सतर्कतेचे नागरिकांनीही कौतुक केले.

 कणकवली शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिरसाट कापड दुकानासमोर असणार्या सदर चरामध्ये वाहने रुतण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. रविवारी देखील चरात टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. या घटनेची दखल घेत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून हे काम तात्काळ आज मार्गी लावले. नगराध्यक्ष श्री. नलावडे यांच्या या तत्परतेबद्दल तेथील व्यापारी व नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले.

कणकवली नगरपंचायतीच्या नळ योजनेची पाईपलाईन लिकेज असल्याने नगरपंचायतीकडून चार दिवसापूर्वी बाजारपेठेत शिरसाट कापड दुकानासमोरील रस्त्यालगत चर खोदण्यात आला होता. मात्र हे लिकेज सापडले नसल्याने रविवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा नगरपंचायतने हे काम हाती घेत लिकेज काढले. मात्र हे काम करत असताना या ठिकाणी खोदलेल्या चरा मध्ये सलग दोन दिवस वेगवेगळे टेम्पो रुतण्याची घटना घडली होती. ही घटना घडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना येथील व्यापाऱ्यांना देखील याचा त्रास होत होता. तसेच पावसाचे दिवस असल्याने या भागांमध्ये संपूर्ण चिखल पसरत होता. 

दरम्यान समीर नलावडे यांनी या घटनेची दखल घेत या चरावरती टाकलेला मातीचा भराव काढून या ठिकाणी मोठ्या दगडांचे सोलिंग करत त्यावर जीएसबी मटेरियल टाकून हे काम रविवारी दुपारी मार्गी लावले. विशेष म्हणजे नगरपंचायत ने केलेल्या या कामावर नगरपंचायत कडून पूर्तता होण्यापर्यंत वाट न पाहता  शहरातील व्यापाऱ्यांना व नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता श्री नलावडे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली. व स्वखर्चातून कामगार व ट्रॅक्टर मधून तेथे लागणारे सोलिंग साठीचे दगड व रॉ मटेरियल पाठवून हे काम मार्गी लावून घेतले. कणकवली नगरपंचायत च्या सत्तेत नसताना देखील श्री नलावडे यांनी यापूर्वी अशी अनेक कामे जनतेच्या हिताचा प्राधान्याने विचार करत स्वखर्चातून मार्गी लावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे शहराच्या सेवेत असलेले दातृत्व अधोरेखित झाले असून पावसाळ्यात चिखलामुळे होणारा त्रास व वारंवार वाहने रुतल्याने बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी या बाबीचा विचार करत नलावडे यांनी याबाबत तात्काळ पावले उचलत व व खर्चातून हे काम मार्गी लावले. श्री नलावडे यांच्या या तत्परतेबद्दल शहरवासीयांमधून व शहरातील व्यापारी वर्गातून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.