पणजी : गोवा मुक्ती आंदोलनात 1955 साली झालेल्या सत्याग्रहात तेरेखोल किल्ल्यावर पोर्तुगीजांनी केलेल्या बेछुट गोळीबारात शहीद झालेले शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र जयंत वाडेकर यांचं निधन झालं आहे. उल्हासनगर, मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गोवामुक्ती आंदोलनात 1955 साली तेरेखोल किल्ल्यावर सत्याग्रही दाखल झाले. त्यांनी गोव्यात आगमन करून भारत मात की जय असे नारे देण्यास सुरूवात हिरवे गुरूजी आणि शेषनाथ वाडेकर हे तेरेखोल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यासाठी पुढे सरसावले असता त्यांच्यावर पोर्तुगिज सैनिकांनी गोळीबार केला आणि त्यात हुतात्मा शेषनाथ वाडेकर (रेवदंडा) व हुतात्मा हिरवे गुरुजी (पनवेल) यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.