सावंतवाडी : हिंदुत्व संकटात आहे म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार संपतात म्हणून आम्ही भाजप सोबत गेलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. संजय राऊत यांच्या जाचाला कंटाळून, अजित पवार शिवसेना संपवतात म्हणून भाजपसोबत गेलो अशी वेगवेगळी कारणं देणारे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आज सांगत आहेत कबुलायदार गावकर प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सत्ता उलथवावी लागली. दीपक केसरकर यांनी एकदा तरी खरं बोलाव, खरं कारण सांगाव. हेच दीपक केसरकर गांधी चौकातील सभेमध्ये म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात पहिला मंत्री केला. मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. जनतेने तुम्हाला मत देऊन निवडून आणले. त्या जनतेशी वेगळी कारण देऊन प्रतारणा का करता ? तुम्ही सत्ता का सोडली याचं कारण जनतेने शोधलल आहे. आंबोलीचा कबुलायतदार गांवकर प्रश्न खराच सुटला आहे का ? की 'ये कश्मीर है !' असंच होणार आहे असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.