भाजपमध्ये अंतर्गत कलह | एकमेकांना संपवण्याचे काम सुरु : परशुराम उपरकर

Edited by: विनायक गावस
Published on: August 28, 2023 13:51 PM
views 512  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह असून दोन ते तीन गट आपापसात एकमेकांना संपवण्याचे काम करत आहेत. त्यामुळेच भाजपच्या काही नेत्यांकडून मोर्चा काढून आपले वरिष्ठ नेते काम करत नसल्याचे दाखवण्यात येत आहे असा आरोप मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केला.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री नारायण राणे यांनी कोकणातील टोलमुक्त करू असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र, ते अद्याप झाले नसून रस्ता पूर्ण होण्याआधीच टोल वसुली सुरू आहे असं मत व्यक्त केले.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक, निलेश देसाई, विजय जांभळे, अभि पेडणेकर, सागर येडगे, रमेश शेळके, प्रमोद गावडे, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.