
कणकवली : कणकवली-आचरा मार्गावरील वरवडे येथील पुलाचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीस बंद घातली आहे. कणकवली आचरा जाणारी वाहतूक कलमठ-कुंभारवाडी मार्गे वरवडे अशी वळण्यात आली आहे. आचरा येथून येणारी वाहने उर्सुला शाळा वरवडे येथून वरवडे-पिसेकामते ते कोटकामते खुडी बुधवळे रस्ता बिडवाडी कलमठ (कुंभारवाडी) १९ मार्गे वळविण्यात आलेली आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वरवडे-पिसेकामते रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचण्याची शक्यता असल्याने अवजड वाहनांचा बंदी घलण्यात आली आहे.
कणकवली तालुक्यातील आचरा (बंदर) वरवडे कणकवली हरकुळ फोंडा उंबर्डे रस्ता रा.मा.१८१ मधील पुलाची पुनर्बाधणी करणे (वरवडे पूल) हे काम प्रगतीत असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे पूल बांधकामाच्यावेळी बांधण्यात आलेला पर्यायी मार्गावर नदीचे पाणी आल्याने व सदर रस्ता पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे. आचरा मार्गाने येणारी जाणारी वाहतूक उर्सुला शाळा वरवडे येथून वरवडे, पिसेकामते रस्ता ते कोटकामते खुडी बुधवळे रस्ता बिडवाडी कलमठ (कुंभारवाडी) मार्गे वळविण्यात आलेली आहे. या मार्गावरून चिऱ्याची अवजड वाहतूक या पर्यायी मार्गावरून तशीच सुरु असल्याने वाहतुकीचे भारमान वाढल्याने वरवडे पिसेकामते रस्त्यावर ठिकाणी खचण्याची शक्यता आहे.
वाहतुकी दरम्यान वाढलेले चिऱ्यांचा भार कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला काही चिरे फेकले जात असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून असल्याने आचरा मार्गाने येणारी जाणारी वाहतूक उर्सुला शाळा वरवडे येथून वरवडे पिसेकामते रस्ता ते कोटकामते खुडी बुधवळे रस्ता बिडवाडी कलमठ (कुंभारवाडी) मार्ग होणारी अतिलांबीच्या व अवजड वाहतुकसाठी बंदी घातल्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढला आहे.