
मंडणगड : तहसील कार्यालय मंडणगड व व्ही.बी.पी. ग्रुप ऑफ कंपनीज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वाकवली गावच्या हद्दीत 513 एकर क्षेत्रावर 3 लाख वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ 17 जून 2025 मोठ्या उत्साहात करण्यात आला. व्ही.बी.पी. ग्रुपच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत महसूल विभाग मंडणगड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमास दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अक्षय ढाकणे, वनअधिकारी तौफिक मुल्ला, वाकवली सरपंच गणेश पेंढारे, पोलीस पाटील मंगेश केंद्रे, शेनाळे पोलिस पाटील अमित बैकर, व्ही. बी. पी. ग्रुप संस्थापक विकास बेंगडे पाटील, नीलम बेंगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्ष सौ. साधना बोत्रे, निवासी नायब तहसीलदार संजय गुरव, महसूल नायब तहसीलदार सुदर्शन खानविलकर, महसुल मंडळ अधिकारी प्रकाश साळवी, निलेश गोडघासे, मयुर पोळ, श्री. गायकवाड, ग्राम महसुल अधिकारी उध्दव घाटूळ, मयुर पंडीत, सौ. मुल्ला, व्ही. बी. पी. ग्रुप सीईओ चंद्रशेखर देशमुख, महागणपती मल्टीस्टेट संचालक पवन हगवने, सौ. शोभा टिकेकर, सी.ई.ओ समाधान सन्नके, सर्व शाखा व्यवस्थापक कोकण वैभव प्रकल्प व्यवस्थापक अनिल सावंत, अनिल प्रताप, आर्किटेक्ट महेश माने, कायदेशीर सल्लागार अँड. सुरज पिल्ले, नंदकुमार दुधे, अनिल जगताप, राजेंद्र कुंभार, बाळासाहेब बोचरे, मच्छिंद्र शेडगे, रमेश जगताप, संतोष पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना प्रांताधिकारी विजयकुमार सूर्यवंशी सांगितले की, “व्ही. बी. पी. ग्रुपच्या पर्यावरणपूरक कार्यासाठी महसूल विभागाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या उपक्रमाची दखल राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल यासाठी महसुल विभाग प्रयत्नशील राहील. तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत महसूल विभागाच्या सर्व यंत्रणा मदतीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. वनअधिकारी तौफिक मुल्ला उपक्रमाचे कौतुक करत वन विभागाच्या सहकार्याची ग्वाही दिली. व्ही.बी. पी. ग्रुपचे चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले, 2020 पासून वृक्ष लागवडीसाठी पायाभूत तयारी करण्यात आली आहे. जमिनीची पूर्वमशागत, पाण्याचे व्यवस्थापन आणि कुंपणाचे काम पूर्ण झाले असून, यावर्षी अगरवूड, रक्तचंदन आणि महोगणी जातींच्या 3 लाख झाडांची लागवड करण्यात येणार आहे. फक्त लागवडच नव्हे तर झाडांचे संवर्धन आणि संगोपनही काटेकोरपणे होईल. हा प्रकल्प राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणचे नाव उज्ज्वल करेल. तीन लाख वृक्ष लागवडीचे शुभारंभास 1,070 झाडांची लागवड यशस्वीरीत्या पार पडली असून पुर्ण पावसाळा ही मोहिम सुरू राहणार आहे, असे व्ही. बी. पी. ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.
प्रकल्पाचे माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने अनेक उपक्रम राबवीले जात आहे यात औषधी झाडांची लागवण व प्रशिक्षण यांचे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. पर्यावऱणात सातत्याने होणारे बदल लक्षात घेता मानवाने निसर्गाशी जवळीक साधली तरच तो शाश्वत विकासाची वाट धरु शकतो पर्यावरण रक्षणातून समृध्दीकडे आश्वासक वाटचाल करणे शक्य आहे त्याकरिता गेल्या पाच वर्षापासून तालुक्यास नवीन ओळख देईल असा प्रकल्प प्रगतीकडे आश्वासक वाटचाल करीत असून त्यास शासन प्रशासन व जनतेचे सहकार्य मिळत आहे.
विकास बेंगडे-पाटील चेअरमन व्ही.बी. पी. ग्रुप